[Marathi] 14 फेब्रुवारी- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान; 14 फेब्रुवारीपासून हवामान कोरडे होणार

February 14, 2018 9:41 AM|

 

स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अलिकडे झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये अतोनात नुकसान झालेले आहे. अवकाळी झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यातील विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामधील १०८६ गावांमध्ये सुमारे १,२५,००० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेले आहे.

[yuzo_related]

प्रामुख्याने बुलढाणा, अमरावती आणि जालना या तीनही भागांमध्ये सर्वाधिक नुकसानाची नोंद झालेली आहेत. ज्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि द्राक्षे यापिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. याशिवाय जळगाव येथेही केळी व शेतीमालाचे नुकसान नोंदवण्यात आलेले आहे.

रविवारी पहाटे साधारण ७:३० च्या सुमारास गारपीटीस सुरूवात झाली आणि जवळपास अर्धा तास सुरु राहिली. स्कायमेट तज्ञांच्यानुसार, पावसासह गारपीट आणि जोराचा वारा हे एक घातक मिश्रण आहे ज्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

सोमवारी देखील चांगल्या पावसाची नोंद करण्यात आलेली असून ज्यामुळे पिकांसाठी परिस्थिती विपरीत झालेली आहे असे म्हणणे वावगे होणार नाही.

गरज और वर्षा वाले बादलों की ताज़ा स्थिति जानने के लिए नीचे दिए गए मैप पर क्लिक करें।Rain in India

बुधवारी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलका पाऊस आणि गडगडाटी हवामान राहण्याची शक्यता आहे. मात्र १४ फेब्रुवारी पासून, पावसाळी वातावरण निवळेल आणि हवामान पुन्हा कोरडे होण्याची शक्यता आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

Similar Articles