Skymet weather

[Marathi] रायगड, रत्नागिरी मध्ये शुष्क हवामान, उन्हाळी पिकास पिकास पाणी दयावे

February 27, 2018 3:11 PM |

ratnagiri post

महाराष्ट्रातील चारही  उपविभागात हवामान प्रामुख्याने उष्ण आणि कोरडे राहिले आहे. दिवसाचे तापमान सरासरीच्या तुलनेत काही अंश  जास्त राहिले ज्यामुळे दिवस मुख्यतः शुष्क आणि  निरभ्र राहिले.

महाराष्ट्रातील इतर  भागांप्रमाणे कोंकण  आणि गोव्यात सुद्धा हवामान उष्ण आणि कोरडे आहे. कमाल आणि किमान तापमानात सुद्धा वाढ होत आहे. कमाल तापमानात तर लक्षणीय  वाढ होऊन, सरासरीपेक्षा ४-५ अंश जास्त, तर किमान तापमान सरासरीच्या  किंचित  वर नोंदले जात आहे.

कालचे, मुंबई आणि रत्नागिरी येथील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ५ अंशाने जास्त होते, त्याप्रमाणेच  अलिबाग येथील सुद्धा तापमान सरासरीपेक्षा  ४ अंशाने जास्त नोंदले गेले.

[yuzo_related]

स्काय मेट वेदर च्या निरीक्षणानुसार, केरळ ते दक्षिण महाराष्ट्रापर्यंतच्या पट्ट्यात कमी दाबाचा कमकुवत पट्टा तयार आहे, पण त्यामुळे येथील हवामानात फारसा फरक संभवत नाही.  म्हणूनच  कोंकण आणि गोव्यातील हवामानात कोणताही बदल नसून, पुढील २-३ दिवस हवामान उष्ण आणि कोरडे राहील. समुद्रकिनारी  असल्यामुळे दिवसा  हवेतील आर्द्रता वाढून, दमटपणा वाढेल. स्वच्छ सूर्यप्रकाश राहील आणि  दिवसाचे प्रकाश तास वाढतील.

शेतीसाठी  शिफारस

उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे  शेतकरी बांधवानी  उन्हाळी  भात, डाळीची पिके आणि कमी कालावधीची फळपिकांना  पाणी  द्यावे. तसेच फुलांवर  आणि फळांवर  असलेल्या  आंबा आणि काजू  पिकांची, कीड पडू  नये म्हणून  काळजी घ्यावी.

Image Credit: Live History India          

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try