Skymet weather

[Marathi] महाराष्ट्रात एकीकडे पूर तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थिती

August 11, 2019 1:42 PM |

Maharashtra weather

निसर्गाच्या मनात महाराष्ट्राबद्दल काय विचार आहे याची खात्री नाही, कारण एकाच वेळी राज्यात पूर आणि दुष्काळी परिस्थिती आहे.

एकीकडे जेथे विनाशकारी पुरामुळे दोन लाखाहून अधिक लोकांना हलविण्यात आले असून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे, तर दुसरीकडे मराठवाड्याच्या दुष्काळी प्रदेशात मेघ-बीजारोपण चालू आहे, जिथे जवळजवळ सर्व धरणांमध्ये सध्या शून्य पाणीसाठा आहे.

परिस्थितीचे गांभीर्य पाहता सरकारने शुक्रवारी मेघ-बीजारोपण / क्लाउड सीडिंग ऑपरेशन सुरू केले. यापूर्वी दुष्काळग्रस्त भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रक्रियेत विमान आणि सी बँड डॉप्लर रडारचा समावेश आहे आणि या प्रयोगामुळे अशी आशा आहे की यामुळे दुष्काळ निर्माण होण्याच्या आणखी एका परिस्थितीला प्रतिबंध होईल.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य अतुल देउळगावकर यांच्या शब्दांत, “हे प्रयत्न जूनमध्येच सुरु करणे अपेक्षित होते कारण आता मेघ बीजारोपणासाठी चांगल्या ढगांची कमतरता आहे. आम्ही औरंगाबादपासून ४० कि.मी. अंतरावर मेघ बीजारोपणाच्या प्रयत्नात आहोत आणि निकालांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. "

मराठवाड्यातील जवळपास ८ जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यादीत मांजरा, माजलगाव, तेरणा, कोळेगाव आणि दुधना या मोठ्या धरणांच्या नावांचा समावेश आहे ज्यात पाणी नाही.

औरंगाबादच्या पैठणमधील केवळ जायकवाडी धरणात ६९.१२ टक्के पाणीसाठा आहे. या मागील प्रमुख कारण नाशिकमधील गोदावरी खोऱ्यात झालेला मुसळधार पाऊस आहे. मराठवाड्याचा मोठा भूभाग गोदावरी खोऱ्यात येतो.

८ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसामुळे राज्यात ३२% पावसाचे आधिक्य आहे आणि याउलट दुसरीकडे मराठवाड्यातील सात जिल्ह्यांत (औरंगाबाद वगळता) पावसाचे दुर्भिक्ष आहे.

Image Credits – The Indian Express

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try