[Marathi] महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार, १४ जुलै पासून हवामान कोरडे

July 12, 2019 2:05 PM|

rain in Maharashtra

कोकण आणि गोवा येथे मध्यम ते जोरदार पाऊस सुरु असून, विशेषतः दक्षिण कोकणात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. याच कालावधीतमुंबईआणि उपनगरातही मध्यम ते जोरदार पाऊस होत आहे. हा पाऊस दिवसभर बरसत असला तरी जनजीवन सामान्य राहिले. तसेच कोठेही पाणी साचण्याच्या घटनेची नोंद केली गेली नाही.

पावसाच्या आकडेवारीबद्दल सांगायचे तर गुरुवार सकाळी ८:३० पासून वेंगुर्लामध्ये १५६ मिमी पावसाची नोंद झाली असून महाबळेश्वरमध्ये १२१ मिमी, हर्णे मध्ये ८५ मिमी, कुलाबामध्ये (मुंबई) ५८ मिमी, रत्नागिरीत ५५ मिमी, माथेरानमध्ये ३८ मिमी, परभणीमध्ये २७ मिमी आणि सांताक्रूजमध्ये (मुंबई) २५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान,मध्य महाराष्ट्रआणि मराठवाड्याच्या काही भागात विखुरलेला पाऊस पडला असून नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. विदर्भ क्षेत्रातही काही ठिकाणी पाऊस पडला असून अकोला आणि चंद्रपूर येथे हलक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच औरंगाबाद आणि परभणी मध्ये देखील हलक्या सरी पडल्या आहेत.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, पावसाच्या गतिविधी मध्ये जरी घट होणार असली तरी राज्याच्या बऱ्याच भागांत गडगडाटासह थोड्याफार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील ट्रफ रेषा दुर्बल झाली असून तिचे दक्षिणेकडे कर्नाटक आणि केरळमध्ये स्थानांतरण होणार असल्यामुळे पावसाची तीव्रता आणखी कमी होईल. परंतु कोकण आणि गोव्यामध्ये पुढील २४ ते ४८ तासांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

१४ जुलैपर्यंत राज्यांतील बऱ्याच भागांतून पाऊस रजा घेईल आणि १७ जुलैपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील. कोरड्या हवामायामुळे पुन्हा एकदा विदर्भातील आणि मराठवाड्यातील पावसाची तूट वाढेल आणि कोकण-गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातील पावसाचा अधिशेष कमी होईल.

Image Credits – The Quint 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

author image