[Marathi] अवघ्या २४ तासात महाराष्ट्रातील जवळपास सहा शहरांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस

September 5, 2019 1:33 PM|

rain in Maharashtra

सध्या बहुविध हवामान प्रणाली पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनची लाट सक्रिय ठेवत आहेत. या प्रणालीसह, गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव आणि उत्तर कोकण ते ओडिशा पर्यंत विभिन्न वेगाचे वारे एकमेकास कापत वाहत असलेले क्षेत्र आहे. तसेचमहाराष्ट्र किनारपट्टीवरपश्चिमेकडील जोरदार वारेही वाहत आहेत.

या सर्व हवामान प्रणालींमुळे मुंबईसह कोकण आणि गोव्यामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. राज्यातील जवळपास सहा शहरांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

दरम्यान, ओडिशावरील कमी दाबाचा पट्टा जो मध्य भारताजवळ सरकत आहे त्याच्या प्रभावामुळे विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

मागील २४ तासांच्या कालावधीत (बुधवारी सकाळी 8:30 वाजेपासून)सांताक्रूझ (मुंबई)येथे २४२ मिमी, तसेच ठाणे येथे २१९ मिमी, माथेरान २०३ मिमी आणि महाबळेश्वर येथे १९५ मिमी पावसाची नोंद झाली.

आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या मते, पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचा ओघ कमी होईल, परंतु दक्षिण कोकणात पाऊस सुरूच राहील, ज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच जवळपासच्या मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील २४ तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान ६ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर कमी होईल.

आज मुंबईत एक किंवा दोन मध्यम सरींसह पाऊस विखुरलेला असेल. उद्या, पावसाचा जोर आणखी कमी होईल आणि तुरळक सरींची शक्यता आहे. पाऊस कमी झाल्याने तापमानात पुन्हा वाढ होईल, ज्यामुळे वातावरण उष्ण व दमट होईल.

दरम्यान, विदर्भातील नागपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांत ७ सप्टेंबरपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस सुरू राहण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नाशिक, पुणे, मालेगाव, जळगाव, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात आज आणि उद्या फक्त हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Image Credits – The Hindu

Any information taken from here should be credited to Skymet Weather

Similar Articles